जळगाव ;- सर्वोच्च न्यायालय व केंद्रीय गृह मंत्रालय नवी दिल्ली महीला बाल अत्याचार प्रतिबंध विभाग मुंबई यांचे आदेशान्वये हरविलेल्या बालकांचे संदर्भात ऑपरेशन मुस्कान-९ ही शोध मोहीम दिनाक ०१/१२/२०२० ते ३१/१२/२०२० या कालावधीत जळगांव जिल्हा पोलीस दलाचे पोलीस अधिक्षक डॉ.प्रविण
मुंढे ,अपर पोलीस अधिक्षक चद्रंकात गवळी , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार वकाले, व सहायक
पोलीस निरीक्षक स्वप्निल नाईक याचे सह पो.हेकॉ. दादाभाऊ पाटील, वसंत लिंगायत,कमलाकर वागुल पो.ना.अविनाश देवरे किरण धनगर ,पो.कॉ. भगवान पाटील, मपोका, गायत्री सोनवणे सर्व पोलीस स्टेशन व जिल्ह्यातील केशवस्मृती प्रतिष्ठान अंतर्गत समतोल प्रकल्प, या संस्थेचे सहकारी प्रदिप पाटील. विश्वजीत सपकाळे ,| योगानंद कोळी यांच्या मार्फत राबविण्यात आली. सदर मोहीमेदरम्यान मुलांचे आश्रयगृह, अशासकीय संस्था, रेल्वे स्थानक, बस स्थानक, रस्त्यातील भिक मागणारी अथवा वस्तु विकणारी मुले अथवा कचरा गोळा करणारी मुले, धार्मीक स्थळे, रुग्णालय, हॉटेल, – दुकाने, सिग्नल, मार्केट व इत्यादी ठिकाणी काम करणारी व भिक मागणारी अशी ५४ मुले-मुली मिळुन आले अश्या मुलांना हरविलेली मुले समजुन त्यांचे फोटो घेवुन, चौकशी करुन त्यांना त्यांचे आई-वडील/त्याचे कायदेशिर पालक यांच्याकडे नेवुन पालकांना (बालकांचे शिक्षणाचे महत्व व भिक मागणेस लावु नये बाबत) कायदेशिर समज देवुन त्यांच्या ताब्यात देण्यात आले. त्यापैकी ३ बालके अनाथ मिळुन आल्याने त्यांना बालगृहात दाखल करण्यात आले आहे.







