रावेर (प्रतिनिधी) : सुकी नदीवर असलेले गारबर्डी धरण दि. १७ रोजी सकाळी ११ वाजता शंभर टक्के भरले. सध्या या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. आषाढी एकादशीच्या दिवशीच हे धरण भरल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. यामुळे पीकापाण्याला फायदा होणार आहे.
सुकी अर्थात गारबर्डी धरण हे मागील वर्षी ६ जुलै रोजी भरले होते. धरण भरल्याने सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या बऱ्याच गावांना या धरणाचा मोठा फायदा होत असतो. सुकी मध्यम प्रकल्पाचा दिनांक १७ रोजीचा एकूण पाऊस ९.०० मिमी, आजचा उपयुक्त साठा ३९.८५ दलघमी पाण्याचा विसर्ग सुरु आहे. लोहारा, कुसुंबा, गौरखेडा, भाटखेडा, उटखेडा कुंभारखेडा, सावखेडा व परिसरातील इतर गावांना या धरणाच्या पाण्याचा लाभ मिळेल.
दि. १७ जुलै रोजी सुकी धरण डोंगराळ धरणातून पाण्याचा विसर्ग धरणातून सुरू आहे. तसेच पुढील काळात पाण्याचा विसर्ग आणखी वाढू शकतो, तरी नदीपात्र जवळील लोकांना दक्षतेचा इशारा देण्यात येत आहे. लोकांनी दक्षता बाळगावी, असे आवाहन सुकी मध्यम प्रकल्पाचे शाखाधिकारी अजय जाधव यांनी केले आहे.