जळगाव (प्रतिनिधी ) – एसबीसी आरक्षण ५० टक्क्याच्या आत बसविण्यात यावे यासंदर्भात देवांग कोष्टी समाज आणि विशेष मागास प्रवर्ग संघर्ष समितीच्या वतीने बुधवारी निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, एससी आणि एसटी सर्व सवलती देण्यात यावेत, एसबीसी प्रवर्गाला क्रिमिलेअरचे तत्व लागू करणार नाही या दोन्ही निर्णयाचा अंमलबजावणी करण्यात यावी, वस्त्रोद्योगाच्या सवलतीच्या योजनेची व्याप्ती पारंपारीक विणकर असणाऱ्या जाती व एसबीसी प्रवर्गात समाविष्ट आहे त्या सवलतींची व्यप्ती वाढविण्यात यावी, एसीबीसीचे दोन टक्के आरक्षण ५० टक्क्यांमध्ये बसविण्यात यावे. यापुर्वी संघटनेच्या माध्यमातून मोर्चे, उपोषण व आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले आहे. परंतू याबाबत आजपर्यंत कोणतीही अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. शासनाने निवेदनाची दखल घेवून न्याय द्यावा अशी मागणी निवेदनातून केली आहे. या निवेदनावर कोष्टी समाजाचे विठ्ठल कोष्टी, दिनेश पारखे, अजय आळंदे, विजय खराडे, कैलास पंधारे, अविनाश गुरसाळे, सुनिल भागवत, विजय पंदारे, सुनिल पंदारे, अर्चना आळंदे, शैला हरीमकर, दिपक अलोणे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.