पुणे (वृत्तसंस्था ) पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरुन राज्यात राजकारणात मोठं वादंग निर्माण झाला आहे. मात्र, पूजा प्रकरणात वानवडी पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद झाली असून इतके आरोप केलं जात असून कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. या घटनेला २१ दिवस झाल्यानंतरही गुन्हा दाखल झालेला नाही. आता या प्रकरणात पहिला गुन्हा दाखल होणार आहे. पूजा राठोडची चुलत आजी शांताताई राठोड आज गुन्हा दाखल करण्यासाठी वानवडी पोलीस ठाण्यात दाखल झाल्याअसून त्यांचा जबाब नोंदवण्याआला आहे . त्यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई या देखील पोलीस ठाण्यासमोर गुन्हा दाखल करावा यासाठी आंदोलन करीत आहे.
सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई हा देखील शांताताई राठोड यांच्यासोबत वानवडी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. तृप्ती देसाई यांनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक लगड यांना गुन्हा दाखल करण्यास सांगितले. मात्र, लगड यांनी तक्रार देण्यास सांगितली. त्यानंतर पूजाची चुलत आजी शांताताई राठोड यांचा जबाब नोंदवण्यात आल्याची माहिती तृप्ती देसाई यांनीदिली . शांताताई राठोड या तृप्ती देसाई यांच्या मदतीने वानवडी पोलीस ठाण्यात गेल्या आहेत. तृप्ती देसाई यांनी पूजाला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी संजय राठोड, अरुण राठोड आणि विलास चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती मीडियाशी बोलताना सांगितले.