जळगाव ;- शेतातील जमा केलेला कापूस भवानी पेठेतील गाळ्यात ठेवला होता . मात्रशॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत जवळपास तीन लाखांचा कापूस जाळून खाक झाल्याची घटना आज सकाळी घडली आहे .
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, हेमराज रामचंद्र चौधरी (वय-५५) रा. अयोध्या नगर, यांचे शहरातील भवानी पेठेतील जमुना मार्केटमध्ये गाळा आहे. त्यांच्या शेतातील कापूस त्यांनी या गाळ्यात भरून ठेवला होता. आज सकाळी गाळ्याच्या बाहेर इमरतीवर इलेक्ट्रीच्या शॉर्टसर्कीटमुळे कापसाला आग लागली होती. महापालिकेच्या पंपाला बोलावून ही आग विझविण्यात आली होती. यात सव्वा तीन लाख रूपये किंमतीचा ६५ क्विंटल कापूस अर्धवट जळाला होता. पहिल्या बंबाच्या पाण्यात पुर्णपणे न विझल्याने आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास पुन्हा कापसाने पेट घेतला. पुन्हा महापालिकेचा बंब बोलाविण्यात आले होते. अशी माहिती सूत्रांनी दिली .