पत्रकार परिषदेत समाधान बाविस्कर यांची माहिती
चोपडा (प्रतिनिधी) – तेलंगाना येथील शेतकरी विकास करणारी भारत राष्ट्र समिति महाराष्ट्रात शेतकरी हिताचा अजेंडा घेऊन आगामी निवडणुका लढणार असल्याची माहिती तालुका समन्वयक समाधान बाविस्कर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
महाराष्ट्रातील सर्वच पक्ष शेतकरीच्या नावाने निवडून येत असतात. परंतु शेतकरी हिताचा एकही निर्णय नसतो. यांचे उदाहरण म्हणजे महाराष्ट्रात रोज होणाऱ्या शेतकरी आत्महत्या होय. त्याचे विपरीत तेलंगणा राज्य होय. तेलंगणा राज्यात एकही शेतकरी आत्महत्या नाही. तेलंगणा राज्यसरकार शेतकऱ्यांना शंभर टक्के विज पुरवठा करत आहे. पीक खर्चासाठी वार्षिक दहा हजार रुपये प्रति एकर दराने रोख रक्कम देत असते. तेलंगनातील भारत राष्ट्र समिती पार्टीचा अजेंडा घेऊन जय किसान,जय महाराष्ट्र हा नारा घेऊन जळगाव जिल्हा पिजून काढणार आहोत. आगामी काळातील पंचायत समिती, जिल्हा परिषद नगरपालिका,तसेच विधानसभा, लोकसभा च्या सर्व निवडणूक स्वबळावर लढणार आहोत. असेही तालुका समन्वयक समाधान बाविस्कर यांनी विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषेदेत बोलताना सांगितले.
यावेळी दिपक पाटील (विधानसभा तालुका प्रमुख), महिला प्रमुख कोमल पाटील, कमिटी प्रमुख पमाबाई पानपाटील, सामाजिक कार्यकर्त्या वर्षा चौधरी, ग्रामपंचायत सदस्य सुशीला सोनवणे, सामाजिक कार्यकर्त्या अक्काबाई नथ्थु सौंदणे, तुळसाबाई सोनवणे, सरलाबाई पाटील, सतीश बाविस्कर आदी मंडळी हजर होती.