केशवराव भोईटे व्याख्यानमालेचे अंतर्गत आयोजन
जळगांव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नूतन मराठा महाविद्यालय, जळगांव आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केशवराव भोईटे व्याख्यानमालेचे अंतर्गत शुक्रवारी दि. १६ रोजी व्याख्यान संध्याकाळी भय्यासाहेब गंधे सभागृहात आयोजित करण्यात आले होते. यावेळी रघुजीराजे आंग्रे हे बोलत होते. प्रसंगी मंचावर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे, शिवाजीराव केशवराव भोईटे, प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख उपस्थित होते. सुरुवातीला कार्यक्रमाची सुरुवात दिवंगत केशवराव भोईटे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली.प्रस्तावनेतून प्राचार्य डॉ. देशमुख यांनी, व्याख्यान घेण्यामागील उद्देश स्पष्ट करीत केशवराव भोईटे यांच्या स्मृतींनाही उजाळा दिला. राजेंद्र नन्नवरे यांनी मनोगत व्यक्त केले. यानंतर “स्वराज्याचे आरमार” या विषयावर व्याख्याते रघुजीराजे आंग्रे यांनी उपस्थित शिवप्रेमी नागरिकांना विविध दाखले देऊन माहिती दिली. शिवाजी महाराज यांचे नेतृत्वगुण वाखाणण्याजोगे होते. त्यांनी स्वराज्य उभारताना सर्व घटकांचा विचार केला होता. त्यामुळे खऱ्या अर्थाने लोकप्रिय स्वराज्याची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती, असे आंग्रे यांनी सांगितले.









