जळगाव (प्रतिनिधी ) – जिल्ह्याच्या अनुषंगाने केळी हे महत्त्वाचे नगदी पिक असून या पिकाखालील क्षेत्र अंदाजे 60,000 हे. एवढे आहे. यासंदर्भात यापूर्वीच पाठपुरावा केलेला असून त्यात केळी पिकाचा समावेश महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत व्हावा याबाबत मागणी केली होती. सदरील पत्र लक्षात घेता शासन निर्णयानुसार केळी या पिकाचा समावेश महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत झाल्याचे आदेश निर्गमित करण्यात आले होते.
शासन निर्णयान्वये केळी पीक लागवडीचे आर्थिक मापदंडाचा अंदाजपत्रक निर्गमित करण्यात आले होते. परंतु सदरील अंदाजपत्रकाचा माहिती घेऊन शेतकरी व केळी तज्ञासमवेत सविस्तर चर्चा करीत असताना खालील प्रमाणे अडचणी निर्माण झाल्या असून त्यातातडीने मार्गी लावा अशी मागणी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी राज्याच्या कृषी विभागाकडे केल्या आहेत. आपल्या पत्रात खासदार उन्मेशदादा पाटील यांनी नमूद केले आहे की सदरील योजनेची
अंमलबजावणी करण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे.अंदाजपत्रकानुसार अडचणी खालील असून यावर तातडीने कार्यवाही करावी.
तात्काळ याविषयी शासनाने लक्ष घालून वरील आढळलेल्या त्रुटी बाबत तात्काळ आदेश द्यावेत जेणेकरून जळगाव जिल्ह्यात कांदेबाग लागवड करणाऱ्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना सदरील योजनेचा लाभ घेणे तात्काळ शक्य होईल. अशी मागणी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी
राज्याच्या कृषी विभागाकडे पाठविण्यात आलेल्या पत्रात नमुद केले आहे.