रावेर ( प्रतिनिधी ) – मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पाल येथे गेलेल्या जळगावच्या तरूणांमधील दोन जण पाण्यात बुडाले काल रात्री उशीरापर्यंत त्यांचा शोध लागला नव्हता.
अक्षय उर्फ उज्ज्वल राजू पाटील (वय २४, रा. खेडी) या तरूणाचा वाढदिवस असल्याने त्याचे सर्व मित्र हे रावेर तालुक्यातील पाल येथे गेले होते. सायंकाळच्या सुमारास हे तरूण पाण्यात पोहण्यासाठी उतरले. यात उज्ज्वल पाटील आणि त्याचा एक मित्र पाण्यात बुडाले. यामुळे भेदरलेल्या मित्रांनी तातडीने ही माहिती घरच्यांना दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
तरूणांच्या नातेवाईकांनीदेखील घटनास्थळी धाव घेतली रात्री उशीरापर्यंत या दोन्ही तरूणांचा शोध घेण्यात आला ते मिळून आले नाहीत.