रावेर ( प्रतिनिधी ) – बऱ्याच दिवसापासून रावेर तहसील कार्यालयातील पुरवठा विभागमध्ये मोठ्या प्रमाणावर नवीन, दुय्यम, विभक्त रेशनकार्ड मिळविणे करिता मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार भ्रष्टाचार विरोधी मोर्चा (दिल्ली ) यांनी केली आहे.

नवीन,दुय्यम,विभक्त रेशनकार्ड काढणार्या व्यक्तीकडून प्रत्येक रेशनकार्ड करिता दोन हजार रुपयांची मागणी होत असल्याचा आरोप भ्रष्टाचार विरोधी मोर्चा ने केला आहे.
रावेर येथील तालुका पुरवठा अधिकारी अतुल नागरगोजे यांनी प्रत्येक रेशनकार्ड धारकाकडून नवीन कार्ड काढणार्या नागरिकांसाठी तीनशे रुपये मागितल्याचा आरोप भ्रष्टाचार विरोधी मोर्चाचे गणेश मनुरे यांनी केला आहे, गणेश मनुरे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, संबंधित अधिकाऱ्याने मलासुद्धा रेशन कार्ड काढण्यासाठी दोन हजाराची मागणी केली आहे.
या सर्व विषयावर भ्रष्टाचार विरोधी मोर्चा यांच्यातर्फे जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी निवेदन देताना प्रदेशाध्यक्ष राहुल गंगावणे,प्रदेश महिला सदस्य वैशाली विसपुते, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील ब्राह्मणे ,शांताराम राखुंडे,अनिल रणधीर ( जिल्हा उपाध्यक्ष) ,शेख सांडू , प्रतिमा रोटे,शेख उस्मान ,कलीम खान, सुकुर भाई, प्रवीण पाटील व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.







