यावल ( प्रतिनिधी ) – भालोद येथील ३१ वर्षीय तरूणाने दुर्धर आजाराला कंटाळून विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली यावल पोलीसात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
रविंद्र प्रभाकर जावळे (वय-३१) असे तरूणाचे नाव आहे. रविंद्र जावळे कुटुंबियांसह भालोद येथे वास्तव्याला आहे. ३० डिसेंबररोजी दुपारी शौचास जातो असे सांगून तो घराबाहेर पडला. रात्री उशीरापर्यंतशोधाशोध केली पंरतू आढळून आला नाही. दरम्यान त्याने भालोद – बामणोद रोडवर एकविरा देवी मंदीराजवळ अशोक चौधरी यांच्या शेतातील विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आत्महत्या करण्यापुर्वी रविंद्र जावळे याने विहिरीजवळ अंगावरील कपडे व चप्पल विहिरीच्या काठाजवळ ठेवली होती. ३१ डिसेंबररोजी सकाळी काही नागरीकांना अंगावरील कपडे आणि चप्पल आढळून आल्याने हा आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. मयत रविंद याला दुर्धर आजार होता. या आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याचे नातेवाईकांना सांगितले. यावल पोलीसांनी मृतदेह विहिरीतून काढून यावल ग्रामीण रूग्णालयात आणला .यावल पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो ना किरण चाटे करीत आहेत.