रावेर पोलीस स्टेशनची कामगिरी
जळगाव (प्रतिनिधी) : रावेर तालुक्यातील कुसुंबा बुद्रुक येथे अज्ञात चोरट्यांनी ३ बकऱ्या चोरून दिल्याची फिर्याद दाखल करण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास लावत ४ संशयित आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
रावेर तालुक्यात दि. १९ सप्टेंबर रोजी दुपारी कुसुंबा बुद्रुक या गावातील पाझर तलावाच्या जंगलातून फिर्यादी गोपाल अर्जुन पिसाळ (वय ५५, रा. मुंजलवाडी ता.रावेर) यांच्या बालकीच्या तीन बकऱ्या अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या होत्या. त्यानुसार रावेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांनी हेड कॉन्स्टेबल रवींद्र वंजारी, सचिन घुगे, विशाल पाटील, प्रमोद पाटील, महेश मोगरे यांचे पथक तपासाकामी रवाना केले होते.
त्यानुसार गोपनीय माहिती मिळाल्यावरून संशयित आरोपी तनवीर रफिक तडवी (वय १९), शरीफ जहाबाज तडवी (वय २५), कलीम हमीद तडवी (वय ३३), अझरुद्दीन महमूद तडवी (वय २० रा. कुसुंबा खुर्द ता. रावेर) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यांनी तीन बकऱ्या चोरी केल्याची कबुली दिली आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल सिकंदर तडवी करीत आहेत.