अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी ) ;- शहरात शेळी चोर पुन्हा सक्रीय झाले असून दि. १५ जुलै रोजी चरण्यासाठी सोडलेल्या बकऱ्यांची एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या भागातून पाच शेळ्यांची चोरी झाली. या प्रकरणी शनिपेठ व शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील आसोदा रस्त्यावरील रहिवासी शोभाबाई साहेबराव देवराज (वय ५३) यांनी दि. १५ जुलै रोजी त्यांच्या मालकीच्या दोन शेळ्या चरण्यासाठी सोडल्या होत्या. सायंकाळच्या सुमारास त्यांना शेळ्या दिसून आल्या नाही. शोभाबाई देवराज यांनी संपुर्ण परिसरात बकऱ्यांचा शोध घेतला, मात्र तरी देखील त्यांना शेळ्या
मिळून आल्याने त्यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध बीएनएस कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ युवराज कोळी करीत आहेत. यासोबतच शिवाजीनगर भागातून समीर रज्जाक शेख (वय ४९) यांच्या मालकीच्या ३० हजार रुपये किमतीच्या तीन शेळ्या अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या. या प्रकरणी शेख यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध बीएनएस कलम ३०३ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ शशिकांत पाटील करीत आहेत.