अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील पातोंडा येथे एका शेतकऱ्याने बंद पडलेल्या पाणी पाऊच कारखान्यांमध्ये बैल चारण्यासाठी बांधले होते. तेथे अचानक बैलाला सर्पदंश झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामुळे पशुमालकाचे मोठे नुकसान झाले आहे.
पातोंडा येथील शेतकरी राहुल महाले यांच्या शेतात मंगळवारी कापूस वेचणी चालू असताना बैल मालक ज्ञानेश्वर बाबुलाल चौधरी यांनी दोन्ही बैल बंद पडलेल्या पाणी पाऊच कारखान्यामध्ये दुपारी चारण्यासाठी बांधले होते. यावेळी एका बैलाला सर्पदंश झाल्याने बैलाचा जागीच मृत्यू झाला. याबाबतची माहिती मिळताच पशुवैद्यकीय अधिकारी रवींद्र गाडे यांनी बैलाचे शवविच्छेदन केले. यामुळे बैलजोडी मालक ज्ञानेश्वर चौधरी यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.