जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील समतनगर परिसरात राहणाऱ्या एका विवाहितेला लग्नाचे आमिष देऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी जळगाव शहरातील रामानंदनगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील समतानगर परिसरात राहणाऱ्या एका विवाहितेचा विवाह झाल्यानंतर तिच्या घराजवळच राहणाऱ्या राजेश भीमराव साळुंखे याच्या सोबत प्रेम संबंध जुळले होते. राजेश साळुंके याने संबंधित महिलेला लग्नाचे आमिष दाखविले. दरम्यान, तिच्या पतीला याबाबत कळल्याने त्याने तिला सोडचिठ्ठी दिली. राजेश साळुंके याने एका मंदिरात विवाह केला त्यानंतर विवाहितेला त्याच्यामुळे एक अपत्य देखील झाले आहे. मंदिरात विवाह केल्यानंतरही राजेश विवाहितेसोबत राहत नव्हता. काही दिवस दोघे मालेगाव येथे राहिल्यानंतर त्याचे वडील आणि भाऊ त्याला घेऊन जळगावी निघून आले. त्यामुळे दोघेही वेगळे राहत होते. एकदा राजेशने विवाहितेला हॉटेलमध्ये घेऊन जबरदस्तीने अत्याचार केला असल्याचे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. राजेश आपल्यासोबत राहण्यास येत नसून एक अपत्य जन्माला घालत आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने विवाहितेने जळगाव शहरातील रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक बिरारी करीत आहेत.







