अमळनेर तालुक्यातील वाघोदे येथील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील वाघोदे येथील शेतकऱ्याने विष प्राशन केले होते. त्यांचा उपचार सुरू असताना मंगळवारी दिनांक ३० जुलै रोजी मृत्यू झाला. पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.
ईश्वरलाल चिंधा पाटील (४६) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे. शेतीमुळे झालेले कर्ज व परिस्थितीला कंटाळून त्यांनी विषारी औषध घेतले असावे अशी माहिती नातेवाईकांकडून मिळाली. दि.२७ रोजी घरी त्याने विष प्राशन केल्याने त्यांना धुळे येथे हलविण्यात आले होते. तेथे उपचारादरम्यान मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे.