जळगाव ;- शहरातील पिंप्राळा भागातील मयूर कॉलनी येथे राहणाऱ्या एका ३५ वर्षीय महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, ज्योती जितेंद्र राठोड (वय ३५) रा. मयुर कॉलनी, पिंप्राळा यांनी आज सकाळी दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार सकाळी उघडकीस आला . रामानंद नगर पोलीसांनी घटनास्थळ धाव घेवून पंचनामा केला. बेशुद्ध अवस्थेत नेलेल्या विवाहितेला रुग्णालयात वैद्यकिय अधिकारी यांनी मृत घोषित केले. या प्रकरणी रामनद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास मनोज राठोड हे करीत आहे.