जामनेर तालुक्यातील जळांद्री खुर्द येथील घटना
जामनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील फत्तेपूर येथून जवळच असलेल्या जळांद्री खुर्द येथील एका शेतकऱ्याने घरांच्या मागील बाजूस गुरांसाठी पत्राचे शेड तयार करुन त्यामध्ये एकूण दहा गुरे बांधलेली होती. मंगळवारी रात्री सुरु असणाऱ्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या घरांची मागील भिंत गुरांच्या अंगावर पडल्याने दोन गायीचा जागेवर मृत्यू झालेला आहे. एक बैल गंभीर स्थितीत आहेत. तर दोन बैल जखमी झालेले आहेत. तलाठी यांनी पंचनामा केलेला असून अचानकपणे कोसळलेल्या संकटामुळे शेतकरी पार खचुन गेलेला आहे. अशा बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांस प्रशासनाने मदत करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे.
जयराम नागो पाटील यांनी घरांच्या मागील जागेत गुरांसाठी पत्राचे शेड तयार करून त्या गोठ्यात एकूण दहा गुरे बांधली होती. काल रात्री सततच्या पावसामुळे जयराम पाटील यांच्या घरांची मागील भिंत गोठ्यात बांधलेल्या गुरांच्या अंगावर मध्यरात्री पडली. भिंतीच्या आवाजाने ते व शेजारी जागे झाले. आणि त्यांनी भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दबलेली गुरे वाचविण्याचा प्रयत्न केला. जेसीबी बोलवून गुरे काढण्यात आली. या घटनेत दोन गायी मृत झालेल्या आहेत. दोघं गायीपैकी एक गाय दुध देणारी तर एक गाय गाभण होती. एक बैल शेवटची घटका मोजत आहे. आणि दोन बैल जखमी झालेले आहेत.
घटनेत पाच गुरे सुरक्षीत असल्याचे समजले. घटनेची माहिती मिळताच गांवचे सरपंच विनोद पारधी, उपसरपंच विठठल पाटिल, पोलिस पाटील नरेश पाटील यांनी तलाठी राजू नाईक यांना घटनेची माहिती दिली. त्यानुसार तलाठी यांनी पंचनामा केलेला आहे. येथील पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरिक्षक गणेश फड यांच्या सुचनेवरून पोलीस उपनिरिक्षक रियाज शेख, पोहेकाँ प्रवीण चौधरी, पोकों मुकेश पाटील यांनी घटनास्थळी भेट गायी दगावल्या असून एक बैल सुध्दा मरणाच्या दारात आहे. असे एकूण तीन गुरांचे म्हणजे ७० ते ८० हजाराचे नुकसान झालेले असल्याचा प्राथमिक अंदाज लावण्यात आला आहे.