जळगाव (प्रतिनिधी ) – पाचोरा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या दोन बहिणी कामानिमित्त जळगावात आले असता त्यांना कुणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली असून याबाबत मुलींच्या पालकांनी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसारज ळगावात कामाच्या निमित्ताने पाचोरा तालुक्यातील दोन बहिणी सोमवारी ५ सप्टेंबर रोजी सकाळी आलेल्या होत्या. यातील एक १५ वर्षाची तर मोठी बहिण ही १८ वर्षाची आहे. गणेश कॉलनीतील एसएनडीटी महाविद्यालयाच्या समोरून दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास रिक्षात बसल्या. त्या रात्री उशीरापर्यंत घरीच परतल्या नसल्याने ६ सप्टेंबर रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दोन्ही मुली बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पोलीसांनी गणेश कॉलनीतील एस.एन.डी.टी. महाविद्यालय परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्याचे काम सुरू केले असून याप्रकरणी दुपारी २ वाजता मुलींच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरेाधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार करताहेत .