अमळनेर ;- महाराष्ट्रातील कोट्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 103 बसेस धुळे येथून रवाना कोट्यातील विद्यार्थ्यांच्या पालकांनी विद्यार्थ्यांना त्याबद्दल माहिती द्यावी असे आवाहन आमदार अनिल पाटील यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री ना अजितदादा पवार परिवहन मंत्री ना अनिल परब यांनी ही व्यवस्था केली यामुळे विद्यार्थ्यांना घरी आणता येणार आहे. याबाबत आमदार अनिल पाटील हे कोट्यात आपल्या पाल्यांसाठी राहिले असल्याने त्यांना याचा अनुभव होता. याबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व परिवहन मंत्री यांच्याशी वारंवार याबाबत पाठपुरावा करत होते. गुरुवारी धुळे जिल्हाधिकारी संजय यादव यांच्याशी चर्चा केली असता आज बुधवारी 103 बसेस कोट्याकडे रवाना करण्यात आल्या आहेत. यात कोट्यात जिल्हाधिकाऱ्यांनी बसेस थांबण्याचे ठिकाण निश्चित केले असून त्या त्या परिसरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना याबाबत सूचित करावे जेणेकरून विद्यार्थी त्या बसेस पर्यत जाऊ शकतील व बस मिळेल त्या बसेस रात्री 12 वाजता पोहचतील अशी माहिती आमदार अनिल पाटील यांनी धुळे जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन माहिती घेतली त्यामुळे आता महाराष्ट्रातील कोट्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांचा मार्ग मोकळा होणार आहे. याबाबत आमदार पाटील यांनी मुख्यमंत्री ना उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व परिवहन मंत्री अनिल परब यांचे आभार मानले आहेत.