मुंबई(वृत्तसंस्था ) : – आज कोरोनाचा सामना करण्यासाठी कठोर नियमांची गरज आहे. मुंबई आणि पुण्यात मोठा धोका संभवतो आहे. त्यामुळे याठिकाणी करोन नियम करा, असा सल्ला राज्यसरकारला राष्ट्रादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. त्याचवेळी पालघरचे राजकारण करणे चुकीचे आहे, असे मत पवार यांनी व्यक्त केले.ते फेसबुक लाईव्हद्वारे बोलत होते. पालघरला जे झाले त्याचा जो काही संबंध असेल तर त्याच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. या प्रकरणातील काही लोकांना अटक करण्यात आली आहे. पालघर प्रकरण आणि करोनाचा कोणताही संबंध नाही. पालघरचे राजकारण घडायला नको हवे होते, असेही ते म्हणालेत.
लॉकडाऊनमध्ये शिथिलता येण्याबाबत शंका
दरम्यान, केंद्राच्या सूचना पाळण्याची खबरदारी आपण घेतली तर कोरोनावर आपण मात करु शकतो. तीन आठवड्यानंतर अधिक सुधारणांसाठी लॉकडाऊनचा कालावधी नाईलाजाने तीन आठवड्यांसाठी वाढवावा लागला आहे. ३ मेपर्यंत अजून १२ दिवसांचा कालावधी आहे. या काळात आपण काळजी घेतली पाहिजे. तरच परिस्थितीत बदल होईल. दुसरीकडे नियमावलीत शिथिलता आणण्याचा निर्णय कदाचित घेतला जाईल याबाबत मनात शंका नाही, असे शरद पवार म्हणालेत. कोरोनाचे संकट परतवून लावण्यासाठी प्रत्येकाने काळजी घ्या, अजिबात बाहेर पडू नका, असे आवाहन करताना मुंबई, पुण्यात नियमांची कठोर अंमलबजावणी केली पाहिजे असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.