जळगाव तालुक्यातील वाकडी येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील वाकडी येथे एका तरुण शेतकऱ्याने शेतामध्ये विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवार दि. २२ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता उघडकीस आली आहे. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सुनील वामन पाटील (वय ४०, रा.वाकडी ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. शेती काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता.(केसीएन)गेल्या काही दिवसांपासून त्याने व्यवसायासाठी कर्ज घेतले होते. ते फेडता येत नसल्याची विवंचना त्याला होती. या विवंचनेतूनच त्याने बुधवार दि. २३ ऑक्टोबर रोजी सकाळी शेतामध्ये विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
कुटुंबीयांना लक्षात येताच त्यांनी तात्काळ त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.(केसीएन)त्या ठिकाणी उपचार सुरू असताना बुधवार दि. २३ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. यावेळी कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. दरम्यान मनमिळाऊ आणि हळव्या मनाचे असलेले सुनील पाटील यांचा यांच्या मृत्यूने वाकडी गावामध्ये शोककळा पसरली आहे. घटनेची एमआयडीसी पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आले आहे.