धरणगाव ( प्रतिनिधी ) – शेतमालकाला मारहाण करून १५ ते १७ मजुरांनी मोबाईल आणि रोकड लांबवल्याप्रकरणी धरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बिपिनचंद्र जगन्नाथ तिवारी यांनी तालुक्यातील अनोरे येथील मुकादम तुकाराम रामा गायकवाड यांच्याकडील सुमारे १५ मजूर शेतातील डाळींब काढण्यासाठी कामाला लावलेले होते. हे मजूर आले परंतू ते काम न करता शेतामधून निघून गेले. सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास शामखेडा शिवारातील शेतात बिपिनचंद्र तिवारी हजर होते. तेव्हा शेतात कृष्णा बारेला, रामलाल करोले, राजू
बारेला हे मजूर शेतात डाळींब तोडत होते. या मजुरांपैकी संदीप रतिलाल सोनवणे (रा. आनोरा), शादु नाईक ( रा. कंडारी, ता. अमळनेर), गोपाल, नरेश, सागर (पूर्ण नाव माहित नाही, सर्व रा. आनोरा) व त्यांच्यासोबत १५ से १७ जणांनी विळा, कुन्हाड, काठ्यांनी काहीच न बोलता तिवारी यांना मारहाण केली. तसेच ओप्पो कंपनीचा १० हजारांचा मोबाईलने त्यांची शुटिंग करत असताना मारहाण करणाऱ्यापैकी एकाने हिसकावून घेतला. तर एकाने पॅन्टच्या उजव्या खिश्यातून ५ हजार रुपये रोख जबरीने काढुन घेतले. यानंतर मारहाण करताना एकाने डोक्यावर कुऱ्हाड मारून दुखापत केली. दरम्यान, करत आहेत.
बिपीनचंद्र तिवारी यांना शेतातील काम करणारे इतर मजूर वाचवण्यासाठी धावत आल्याचे पाहून संदीप रतिलाल सोनवणे, शाह नाईक, गोपाल, नरेश, सागर (पूर्ण नाव माहित नाही) व त्यांच्या सोबतच्या १५ ते १७ जणांनी तुझ्यावर अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करु, असा दम दिल्याचेही तिवारी यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. तिवारी य्यांच्या डोक्याला ३ टा पडल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे. दरम्यान, या प्रकरणी तिवारी यांच्या फिर्यादीवरुन धरणगाव पोलिसांत १५ ते १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आहे. पुढील तपास धरणगाव पोलीस