जामनेर येथे कार्यक्रम संपन्न
जामनेर (प्रतिनिधी) – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही महाराष्ट्रातील एक प्रमुख लोकचळवळ आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी ९ ऑगस्ट रोजी काही मोजक्या सहकाऱ्यांसह महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली. आज दि. ९ ऑगष्ट रोजी संघटनेच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने डोहळे परिवाराच्या सौजन्याने मानसिक आरोग्यावर पोस्टर द्वारे प्रदर्शन घेण्यात आले.
विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना प्रवेशापासून ते परिक्षेपर्यंत तणावाखाली असतात, चांगल्या शाखेत प्रवेश मिळण्यासाठी प्रचंड स्पर्धा आहे. अशावेळी कमी गुण मिळणे, यश न मिळणे अशा कारणाने विद्यार्थी तणावाखाली येतात. विद्यार्थ्यांचा ताण-तणाव कमी करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्य, ताण-तणाव, यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जळगाव जिल्हा महिला सहभाग विभागाच्या सुशीला चौधरी यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात क्विझ एन एक्स या स्पर्धा परीक्षेसाठी मोबाईल ऍपची माहिती ललित सोनार व आझाद बोरसे यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जामनेर शाखेचे भीमराव दाभाडे यांनी केले. सूत्रसंचालन ज्ञानगंगा विद्यालयाचे विजय कोळी यांनी केले.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा प्रधान सचिव प्रल्हाद बो-हाडे, शाखेच्या महिला सहभाग विभागाच्या शोभा बो-हाडे, रितेश मोरे, तसेच ज्ञानगंगा विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र सोनवणे, एकलव्य विद्यालयाचे मुख्याध्यापक देविदास काळे, मनीषा भारंबे, योगेश बावस्कर, विनय खोंडे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.