जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील नशिराबाद येथील शेतकऱ्याने राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केले मुलगा दुपारी जेवणासाठी घरी आला त्यावेळी ही घटना उघडकीस आली दरम्यान आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.
रविंद्र राजाराम पाटील (वय ५२, रा. नशिराबाद ता जळगाव) असे मयत इसमाचे नाव आहे. ते नशिराबाद येथे प्रगतिशील शेतकरी म्हणून परिचित होते. अनेक वर्षांपासून पिढीजात शेती करण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. बुधवारी १७ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास राहत्या घरी कोणी नसताना त्यांनी छताला दोरी लावून गळफास घेतला.
दरम्यान दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा घरी जेवणासाठी आला असताना त्याने वडिलांना गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिले. त्यावेळी एकच हंबरडा फोडला. त्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे नागरिक धावत आले. त्यांनी रवींद्र पाटील यांना खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे उपचारासाठी दाखल केले. रुग्णालयात तपासणीअंति सीएमओ डॉ. निरंजन देशमुख यांनी मयत घोषित केले.
मयत रवींद्र पाटील यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे. घटनेची माहिती नशिराबाद पोलीस स्टेशनला मिळाली असून पोलीस पुढील माहिती घेत आहे.