जळगाव ( प्रतिनिधी ) – सलग ४ दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे गिरणा खोऱ्यात असलेल्या छोट्या नद्या – नाल्यांचे पाणी वाढी शकते या पार्श्वभूमीवर गिरणा नदीला पूर येऊ शकतो म्हणून जिल्हा प्रशासनाने गिरणा काठावरील गावांना सुरक्षिततेचा इशारा दिला आहे .
आज ( दि १४) गिरना धरणात दुपारपर्यंत ८० टक्के जिवंत साठा संकलित होईल असा अंदाज आहे , वरून येणारा पुराचा येवा बघता व धरण सुरक्षिततेचा आढावा घेऊन आज दुपारनंतर गिरना धरणातून जास्तीचे पुराचे पाणी खाली गिरना नदीत सोडण्यात येणार आहे, नदी काठावरील नागरिकांनी सावध रहावे, कोणतीही जीवित व वित्त हानी होणार नाही याची काळजी घ्यावी, पुराचा प्रवाह हा पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या पाण्याच्या ओघाप्रमाणे कमी जास्त करण्यात येईल. साधारणतः धरणातून करण्यात येणारा विसर्ग सुरवातीला २०००० क्यूसेक इतका राहील व नंतर पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या येवानुसार विसर्ग १००००० क्यूसेक पर्यंत जाण्याची शक्यता आहे, तो येणाऱ्या येवानुसार वेळो वेळी कमी जास्त होऊ शकतो ,तरी सर्वांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन कार्यकारी अभियंता, ( गिरना पाटबंधारे विभाग, जळगाव ) व जिल्हा प्रशासन यांच्या वतीने करण्यात आले आहे.