रावेर ( प्रतिनिधी ) – वादळामुळे तुटून पडलेल्या विजेच्या तारांचा धक्का लागल्याने खिरोदा येथे बालकाचा मृत्यू झाला आहे.
रावेर तालुक्याला काल सायंकाळी वादळाने तडाखा दिला. खिरोदा परिसराला फटका बसला. अनेक ठिकाणी पत्रे उडाली. तारा देखील खाली पडल्या. यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले
आज सकाळी खिरोदा येथील बाहेरपुरा भागातील रहिवाशी अफसर अजित तडवी याच्या पाच वर्षाच्या बालकाचा विजेच्या धक्क्याने अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली. काल वादळात पडलेल्या तारांना त्याचा स्पर्श झाल्याने या चिमुकल्याला प्राण गमवावा लागल्याने परिसरावर शोककळा पसरली आहे. सावदा पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे. महावितरणने तातडीने खाली पडलेल्या तसेच लोंबकणार्या तारांची दुरूस्ती करावी अशी मागणी होत आहे.