जामनेर ( प्रतिनिधी ) – येथील ब्राह्मण संस्थेच्या वतीने रामकथेचे आयोजन करण्यात आले आहे .
2 ते 9 एप्रिल या कालावधीत रामकथेचे आयोजन करण्यात आलेले आहे. जनमानसाला “राम” कळावे, त्यांचा आदर्श आणि सद्गुण आयुष्यात रुजवता यावे आणि समाजाची जडण-घडण होण्यासाठी मदत व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे , असे आयोजकांनी सांगितले . रामकथेचे निरूपण करण्यासाठी धुळे येथून निला रानडे यांना आमंत्रित केले आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुरु झालेल्या या उपक्रमाची सांगता ९ एप्रिलला होणार आहे. सर्व भाविकांनी या राम कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन ब्राह्मण संस्था ( जामनेर ) यांनी केले आहे.