जळगाव (प्रतिनिधी ) – जिल्ह्याच्या २२५ कोटी रुपयांच्या वार्षिक विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली असल्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्त्तार यांनी सांगितले .जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हा नियोजन बैठक घेण्यात आली होती . या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते .
जिल्ह्यात अवैध वाळूची तस्करी होत असून ती रोखण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले असल्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज जिल्हा नियोजनाच्या बैठकीनंतर सांगितले
पत्रकारांनी विचारलेल्या राजकीय प्रश्नांना अब्दुल सत्तर यांनी जास्त बोलणे टाळून थोडक्यात उत्तरे दिली . स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीत शिवसेनेने कुणाशी युती करावी याचा अंतिम निर्णय आमचे पक्षप्रमुख घेतील . आमच्या पक्षाचे सगळेच निर्णय आमचे पक्षप्रमुख घेतात त्यांचा निर्णय आमच्यासाठी अंतिम असतो . काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल नेमके काय म्हणाले . याची चौकशी राज्य सरकार आणि पंतप्रधान कार्यालय करिन त्यातून काय वास्तव आहे ते स्पष्ट होईल . पटोले यांच्या वक्तव्याचा मोडतोड करून प्रसार होणे योग्य नाही त्यामुळे या विधानाच्या निषेधार्थ भाजपने आंदोलन आता थांबवावे, असेही ते म्हणाले.