अमरावती ( वृत्तसंस्था ) – जिल्ह्यातील झुंज या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी वर्धा नदीत बोट उलटून ११ जण मंगळवारी बुडाले नावाड्यासह चौघांचे मृतदेह सापडले इतरांचा शोध सुरू आहे.

गाडेगावच्या मटरे कुटुंबातील दशक्रिया विधीला उपस्थित राहण्यासाठी नातेवाईक पोहचले होते. दशक्रिया विधी आटोपल्यानंतर मंगळावरी सकाळी सर्व झुंज येथे पोहचले. नदीपात्रातच कमी उंचीचा धबधबा असून पर्यटक गर्दी करतात. सकाळी बोटीतून महादेव मंदिराकडे जात असताना पर्यटकांची बोट नदीपात्रात उलटली. त्यात अकरा जण बुडाले. यामध्ये बहीण, भाऊ, जावई यांचा समावेश आहे.
सर्वांना जलसमाधी मिळाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मदत व बचाव पथकाला पाचारण करण्यात आले बुडालेल्याचा शोध सुरू आहे. घटनास्थळी उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी पोहचले. चौघांचे मृतदेह हाती लागले असून यामध्ये नावाड्यासह एक महिला आणि चिमुकलीचा समावेश आहे.
स्थानिक आमदार देवेंद्र भुयार यांनी या घटनेबाबत माहिती दिली आहे. “नागपूर आणि अमरावती जिल्ह्याच्या संगमवार हे ठिकाण आहे नदीचे पात्र मोठे असल्याने तिथे बोटींग करण्यात येते. क्षमतेपेक्षा जास्त लोकं या बोटीमध्ये बसल्यामुळे ती उलटली असल्याचा अंदाज आहे.







