जळगाव (प्रतिनिधी ) ;- भाजपा फुटीर नगर सेवक यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये स्वतःला पांडव व भाजपा निष्ठावंतांना कौरव म्हटले आहे. मात्र पांडवांमधील नैतिकतेचा एक गुण तरी त्यांच्यात आहेत का ? जर बंडखोरांमध्ये नैतिकता असती तर नगरसेवक पदाचा राजीनामा देऊन पोट निवडणुकीत निवडून यावे असे आव्हान नगरसेवक आणि महानगर सरचिटणीस विशाल त्रिपाठी यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे कि, जनतेने भाजपाच्या चिन्हावर आपणांस निवडून दिले. हे जळगावच्या जनतेला माहिती आहे की बंडखोरांचे पक्षांतराचा हेतू काय आहे, जनतेला मूर्ख समजू नये. इतकीच जर शहराच्या विकासाची आच असेल तर आपण ज्या पक्षात गेले त्या पक्षाची राज्यात सत्ता आहे व आता महानगरपालीकेत ही आहे. आपली राजकीय पत सिध्द करून १०० कोटी निधी आपण आणून आपली राजकीय पत सिध्द करावी. असे खुले आवाहन करने. आपण आता भाजपाचे नगरसेवक नाही. त्यामुले आम्ही काय करावे हे फुकटचे सल्ले आम्हाला देऊ नये. जी बंडखोरी आपण केली ती चुकीच्या पद्धतीने बेकायदेशीर जनतेचा विश्वस घात करून केली त्यामुळे भाजपा त्यावर कायदेशीर लढा देईल. मा.न्यायालय योग्य तो निर्णय घेऊन कार्यवाही होणारच याबद्दल कोणतीही शंका नाही. भाजपचे नगरसेवक आणि महानगर सरचिटणीस विशाल त्रिपाठी यांनी म्हटले आहे.







