नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशभरात कोरोना व्हायरस झपाट्याने परसरत आहे. आतापर्यंत 1139 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यामधील 30 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान कोरोनाविषयी मोदी सरकारने 11 समित्यांची स्थापना केली आहे. कोरोनामुळे देशावर जी परिस्थिती ओढावली आहे. त्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी योजना आखण्याची जबाबदारी या किमिटीवर असणार आहे. त्याचे अध्यक्ष एनआयटीआय आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. पॉल हे आहेत.गृह मंत्रालयाकडून रविवारी या किमिटीची स्थापना करण्यात आली. या कमिटीमध्ये मोदी सरकारच्या सीनियर ऑफिसरचा समावेश करण्यात आला आहे. पहिली कमिटी मेडिकल इमरजेंसी मॅनेजमेंटच्या प्लानसाठी स्थापन करण्यात आली आहे.
या व्यतिरिक्त, रुग्णालय उपलब्धता, आयसोलेशन आणि अलग ठेवणे आणि रोग परीक्षण, चाचणी व क्रिटकल केअर ट्रेनिंग यासाठी आणखी एक समिती स्थापन केली आहे. या व्यतिरिक्त वैद्यकीय उपकरणे, लोकांसाठी अन्न व औषध, खासगी क्षेत्रातील स्वयंसेवी संस्था आणि स्वयंसेवी संस्था यांच्याशी समन्वय साधण्यासाठी व लॉकडाऊनसाठी इतर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.