जळगाव ( प्रतिनिधी ) ;- कोरोनाच्या संक्रमणामुळे पाचवी ते आठवीसाठी शासनाचे कालपर्यंत कुठलेच आदेश नसतांनाजवळ जवळ सर्व शाळांमध्ये त्या शिक्षकांना शंभर टक्के उपस्थितीची सक्ती केली जात आहे.जेव्हा कि कोरोना कारणास्तव खुद्द महसूल विभाग, शिक्षण विभाग सुद्धा पाच दिवसांचा आठवडा म्हणूनच काम करीत आहे. अश्यावेळी शिक्षणाधिकारी यांनी स्थानिक पातळीवर तसे स्पष्ट आदेश काढून शाळा प्रशासनाला ते निर्गमित करावे.असे निवेदन जिल्हाध्यक्ष भाजप शिक्षक आघाडी प्रवीण जाधव यांनी (माध्य)शिक्षणाधिकारी यांना दिले.

राज्यशासनाच्या आदेशानुसार योग्य काळजी घेवून जिल्ह्यातील नववी ते बारावी शाळा सुरु केल्या त्याचे स्वागतच पण त्या खालील वर्गाला आदेश नाहीत.मग त्यांना सक्तीने उपस्थिती का?शाळा सकाळशिफ्ट व दुपार शिफ्ट अश्या असतात. काही ठिकाणी सकाळी ५ वी ते ८वी वर्ग असतात.ते वर्गच शासनाच्या आदेशानुसार भरत नाही.तरी सुद्धा शाळा प्रशासन सर्वाना सक्ती करून वेठीस का धरतात. ५०% चे कर्मचारी उपस्थिती म्हणून आपण तसे आदेश करावे अशी अपेक्षा संबधित शिक्षकांकडून होत आहे.प्रत्यक्षात ऑनलाईन ते वर्ग सुरु आहेतच.शिक्षकांचे सुद्धा काम सुरु आहे.इतर जिल्ह्यात शिक्षणाधिकारी यांनी संबधित शिक्षकांना बोलवल्यास कायदेशीर कार्यवाहिला सामोरे जाल असे स्पष्ट आदेश शाळांना काढले आहेत अश्याच पद्धतीचा न्याय त्वरित जळगाव जिल्ह्याला सुद्धा व्हावा.हि विनंती अश्या आशयाचे निवेदन भाजप शिक्षक आघाडीने (माध्य)शिक्षणाधिकारी यांना दिले.







