जळगाव शहरात गायत्री नगर येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- गायत्री नगर येथील बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख ९ हजार रुपयांसह सोन्या-चांदीचे दागिने, चांदीचे पूजेचे साहित्य आणि लॅपटॉप असा एकूण ३७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी रविवारी ७ जून रोजी दुपारी २ वाजता अज्ञात चोरट्यांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. ३१ मे ते ६ जून दरम्यान, मेकलकर कुटुंबीय नातेवाईकांच्या लग्नसोहळ्यासाठी बाहेरगावी गेले असताना ही चोरी झाली. गायत्री नगरातील रहिवासी ज्योती संदीप मेकलकर (वय-४५) या कुटुंबीयांसह नातेवाईकांच्या लग्नसोहळ्यासाठी बाहेरगावी गेल्या होत्या. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा दरवाजा तोडला. घरात प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी लोखंडी कपाटातून रोख ९ हजार रुपये आणि ६ हजार रुपये किमतीची सोन्याची बाळी व नथ लंपास केली. याव्यतिरिक्त, १० हजार रुपये किमतीचे चांदीचे पैंजन, चांदीचे नाणे, कुंकवाचे दोन करंडे आणि १२ हजार रुपये किमतीचा लॅपटॉप असा एकूण ३७ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. या प्रकरणी रविवारी ७ जून रोजी दुपारी २ वाजता अज्ञात चोरट्यांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.