यावल (प्रतिनिधी) – साहित्यरत्न , लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणीचे निवेदन यावल तालुक्यातील भिम आर्मी भारत एकता मिशन या सामाजिक संघटनेच्या वतीने दि. ३१ जुलै शुक्रवार रोजी यावल नायब तहसिलदार आर डी पाटील यांना देण्यात आले.
दिलेल्या निवेदना नुसार साहित्यरत्न, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता येत्या दि. ०१ ऑगस्ट २०२० रोजी होत आहे. साहित्य आणि समाजकारण यामध्ये आदरणीय आण्णाभाऊ साठे यांनी वंचीत समाजाचे वास्तव त्यांच्या व्यथा, वेदना आपल्या अजरामर साहित्यातून अतिशय परिणाम कारक पध्दतीने जगासमोर मांडल्या आहेत. शिवाय श्रमिकांसाठी त्यांनी उभारलेल्या लढयाची दखल थेट रशियाने घेतली आहे.
आदरणीय आण्णाभाऊ साठे यांचे साहित्यक्षेत्रातील कार्य विचारात घेऊन त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करुन जन्मशताब्दी निमित्त समाजास एक आगळी-वेगळी शुभेच्छारुषी भेट द्यावी. यासाठी शासन स्तरावर प्रस्ताव तयार करुन केंद्राकडे पाठवावा. अशी मागणी निवेदन यावल तालुका भिम आर्मी भारत एकता मिशन या सामाजिक संघटनेने आज दि. ३१ जुलै शुक्रवार रोजी यावल नायब तहसिलदार आर डी पाटील यांना देण्यात आले. यावेळी भिम आर्मी भारत एकता मिशन संघटनेचे जळगाव जिल्हा सचिव सुपडू संदानशिव , यावल तालुका अध्यक्ष हेमराज तायडे , सचिव प्रशांत तायडे , भिमराव सावळे यांच्या सह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .