जळगाव (प्रतिनिधी) – कोरोनाच्या अहवालात रविवारी काहीसा दिलासा मिळाला आहे. आज सोमवारी ३० रोजी जिल्ह्यात ३६ रूग्ण आढळून आले आहेत तर ४८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तब्बल अकरा तालुक्यात आठवडाभरानंतर रुग्णसंख्या निरंक आली आहे.

आजच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील एकुण आकडा ५४५६१ वर पोहचली आहे, यापैकी ५२७२५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे तर ५३७ रूग्ण उपचार घेत आहे. सोमवारी २ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.
जळगाव शहर १५, भुसावळ ५,अमळनेर ५, चोपडा १, पाचोरा २, भडगाव १, धरणगाव १, बोदवड २, रावेर १, पारोळा १, चाळीसगाव २, बोदवड २, इतर जिल्हा ० असे ३६ रुग्ण आढळले आहे. तर यावल एरंडोल, जामनेर, मुक्ताईनगर, जळगाव ग्रामीण असे चार तालुक्यात रूग्ण संख्या निरंक आढळून आली आहे.तर बोदवड (४), धरणगाव (५), जळगाव ग्रामीण, चाळीसगाव (१०) हे तालुके कोरोना मुक्तीकडे वाटचाल करीत आहेत.







