जामनेर ( प्रतिनिधी ) – जनमत प्रतिष्ठानने जामनेरात करीयर महोत्सव आयोजित केला होता . यशाची चव सहजासहजी मिळत नाही असा सल्ला यावेळी प्रा, सचिन देवरे यांनी तरुणांना दिला .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा साधना महाजन होत्या . प्रमुख अतिथी म्हणून जितेंद्र पाटील, तहसीलदार अरुण शेवाळे , नायब तहसीलदार प्रशांत बोरकर , दीपक पाटील ,प्रशांत भोंडे, सुनील ठाकरे , गटशिक्षणाधिकारी सरोदे , गाडेगावचे माजी सरपंच विजय चौधरी व ठाकरे एज्युकेशनच्या संचालिका ऐश्वर्या ठाकरे उपस्थित होत्या .
प्रा, देवरे पुढे म्हणाले की दारिद्र माणसाला संपवू शकत नाही पण आळस व उदासीनता नेस्तनाबूत करतात माणसाला यश मिळवायचे असल्यास आत्मविश्वास , जिद्द , चिकाटी , प्रामाणिकपणा , हजरजबाबीपणा व वेळेचे नियोजन हवे, ध्येयप्राप्तीसाठी जेवढी तळमळ जास्त तेवढी यशाची शक्यता जास्त असते, चारित्र्य जोपासा व समाजाचे आपण देणे लागतो ही भावना अंगिकारा असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले,
विपुल पालक यांनी सांगितले की ध्येयप्राप्तीसाठी सुरूवातीपासूनच ध्येय निश्चित करा तुम्हाला यश निश्चित मिळेल, जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले यांनी सांगितले की दरवर्षी आपण या महोत्सवाचे नियोजन करत राहणार, ठाकरे एज्युकेशनच्या ऐश्वर्या ठाकरे यांनी परीक्षेला जाताना काय तयारी करायला हवी याबाबत मार्गदर्शन केले, सूत्रसंचालन प्रतिभा मेटकर यांनी केले . गणेश जोशी प्रा, विजय वानखेडे व हर्षाली पाटील तसेच सुनिल परदेशी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.