नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – प्रजासत्ताक दिनी अवघ्या जगाचे लक्ष भारताकडे लागले असताना शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली समाजकंटकांनी राजधानी दिल्लीमध्ये धुडगूस घातला. शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसेचे वळण लागले.देशाच्या अस्मितेवर घाला घालणाऱ्या आंदोलकांनी पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न काल झाला.

कालच्या हिंसाचाराच्या घटनेत 86 पोलीस कर्मचारी जखमी झाले असून 15 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुकरबा चौक, गाझीपूर, सीमापुरी, नांगलोई टी पॉंइंट, टिकरी बॉर्डर आणि लाल किल्ला भागात झालेल्या हिंसेत 86 पोलीस कर्मचारी जखमी झाले अहेत. तसेच या हिंसेत 17 खासगी गाड्यांचे नुकसान झाले आहे. गाजीपूर, सिंघु आणि टिकरी बॉर्डरवर आंदोलनकर्त्यांनी पोलिसांचे बॅरीकेड्सही तोडले आहेत.
जगभरातून या हिंसाचाराचा निषेध व्यक्त केला जात आहे. या कालच्या लाजिरवाण्या घटनेमुळे भारताची मान शरमेने झुकली असल्याचे दिसून येत आहे.दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री अमरेंद्र सिंह यांनी दिल्लीतील हिंसाचाराची निंदा केली असून,काही समाजविरोधी शक्तींचा या हिंसाचारामागे हात असल्याचं म्हंटल आहे.गेले दोन महिने दिल्लीच्या सीमांवर शांततेत आंदोलन करणाऱ्या खऱ्या शेतकऱ्यांनी दिल्लीतून बाहेर पडून आपल्या मूळ आंदोलन ठिकाणी दिल्लीच्या सीमेवर जावं असं आवाहनही मुख्यमंत्री अमरेंद्र सिंह यांनी केल आहे. तसच त्यांनी पंजाबमध्ये सतर्कतेचा इशारा दिला आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनीही काल हरियाणातील वरिष्ठ पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन,राज्यात सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.







