इटली (वृत्तसंस्था) – इटलीने भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी आणली आहे. भारतामध्ये झपाट्याने वाढणार्या कोरोना संसर्गामुळे इटालियन सरकारने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वीही ब्रिटन, पाकिस्तान, न्यूझीलंड, कॅनडा या देशांनी भारतीयांवर प्रवासी बंदी लादली आहे. इटलीचे आरोग्यमंत्री रॉबर्टो स्प्रान्झा यांनी ट्विटरवर म्हटले आहे की,’गेल्या 14 दिवसांत जी लोकं भारतात गेले आहेत किंवा जे भारतातून आले आहेत त्यांवर बंदी घालण्याच्या आदेशाला त्यांनी मान्यता दिली आहे. भारताला गेले काही दिवस कोरोनाच्या गंभीर संकटाचा सामना करावा लागत आहे. विशेषतः डबल म्यूटेंटमुळे भारतावर वाईट परिणाम झाला आहे.

दररोज सलग 3 लाखाहून अधिक उघडकीस येणाऱ्या संसर्गाच्या घटनांमुळे भारतात हाहाकार सुरू आहे. दररोज नवीन प्रकरणांची वाढणारी ही आकडेवारी पहिल्या लाटेपेक्षा तीन पट जास्त आहे. रविवार बद्दल बोलायचे झाले तर, जगात सलग चौथ्या दिवशी भारतामध्ये सर्वाधिक प्रकरणे आढळली आहेत. ज्यामुळे इटलीने भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे, परंतु आपल्या नागरिकांना अटींसह सूटही दिली आहे. यासाठी त्यांना ट्रिपपूर्वी आपली कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट दाखवावा लागेल. याशिवाय त्यांची पुन्हा एकदा कोरोना टेस्ट केली जाईल.
एवढेच नव्हे तर दोन्ही टेस्ट मध्ये निगेटिव्ह आढळल्यानंतरही त्यांना क्वारंटाइन व्हावे लागेल. याखेरीज जी लोकं फक्त इटलीमध्ये आहेत, परंतु गेल्या 14 दिवसात कधीतरी त्यांनी भारत दौरा केला होता त्यांनादेखील या टेस्टिंगला सामोरे जावे लागेल. इटलीचे आरोग्यमंत्री म्हणाले की,’आपले वैज्ञानिक भारतातून आलेल्या कोरोना व्हेरिएंटची टेस्टिंग घेण्याचे काम करत आहेत. दरम्यान, सोमवारी गेल्या 24 तासांत भारतात 3.54 लाख नवीन प्रकरणे आढळली आहेत. या व्यतिरिक्त 2,806 लोकं मरण पावले आहेत. भारतामध्ये एकाच दिवसात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. अनेक दिवसांपासून देशात सर्वाधिक नवीन रूग्ण आणि मृत्यूची नोंद होत आहे. नवीन संक्रमित लोकांची संख्या तीन लाखांपलीकडे गेली असताना हा सलग सहावा दिवस आहे.







