पाचोरा (प्रतिनिधी) – कुरंगी गावातील नागरी समस्यांना प्रथम प्राधान्य देऊन सर्वांच्या सहकार्याने गावाचा सर्वांगीण विकास साधणार असल्याचा विश्वास कुरंगी येथील नूतन सरपंच सीमा पाटील यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या निवडीबद्दल आयोजित सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
कुरंगी येथील मावळत्या सरपंच मनीषा गणेश पाटील यांचा दोन वर्षाचा कार्यकाळ संपल्याने आपसात ठरल्याप्रमाणे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर पुढील सरपंच म्हणून सीमा नागराज पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. दि. २३ मे रोजी कुरंगी ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी नांद्रा मंडळ अधिकारी प्रशांत पगार, ग्रामसेवक आबासाहेब पाटील यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली.
सीमा पाटील यांचा एकमेव सरपंच पदासाठी अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी पगार यांनी त्यांची बिनविरोध निवड घोषित केली. मावळत्या सरपंच मनिषा पाटील यांनी आपल्या कार्यकाळात अनेक समाजाभिमुख कामे करून आदर्श घालून दिला होता त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवून अधिक दर्जेदार काम सर्वांना विश्वासात घेऊन पुढे सुरूच ठेवणार असा निश्चय नवीन सरपंच केला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य मनीषा गणेश पाटील, शालिग्राम पाटील, योगेश पाटील, मंगलाबाई पाटील, दिनकर सोनवणे, अविनाश कोळी हे उपस्थित होते.
नवीन सरपंच पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी कुरंगी बांबरुड गटाचे माजी जि प सदस्य पदमसिंह पाटील, माजी पं.स. सभापती पंढरीनाथ पाटील, प्रवीण ब्राह्मणे,राजेंद्र पाटील,विजय पाटील, प्रा यशवंत पवार, प्रा अमोल झेरवाल यांच्यासह एस बी बिल्डरचे संचालक नितीन पाटील, संदीप पाटील,विश्वनाथ भिवसने,विशाल नेवे यांची उपस्थिती होती. कुरंगी विकास सोसायटीचे चेअरमन रंगराव पाटील, ज्ञानेश्वर पाटील, पंढरीनाथ पाटील, गणेश पाटील, किरण मोरे, भैय्या पाटील, नंदलाल पाटील, शिवलाल पाटील, प्रकाश पाटील, पोपटराव पाटील, नामदेव पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सरपंच सीमा पाटील ह्या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नगराज पाटील यांच्या पत्नी आहेत.