जळगाव (प्रतिनिधी) – गेल्या दोन दिवसांपासून कोरोनाच्या अहवालात आता रूग्ण संख्येत वाढ होतांना दिसून येत आहे. आज जिल्ह्यात ६५ रूग्ण आढळून आले आहेत तर ३९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे.
आजच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील एकुण आकडा ५४१७७ वर पोहचली आहे, यापैकी ५२४४७ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे तर ४४१ रूग्ण उपचार घेत आहे. सोमवारी ३ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.
जळगाव शहर १७, जळगाव ग्रामीण ४, भुसावळ ११, अमळनेर १, चोपडा ५, पाचोरा १, यावल २,जामनेर २, रावेर ६ ,पारोळा २,चाळीसगाव ३, मुक्ताईनगर १०, इतर जिल्हा १ असे ६५ रुग्ण आढळले आहे. तर एरंडोल, भडगाव, बोदवड, धरणगाव, चार तालुक्यात रूग्ण संख्या निरंक आढळून आली आहे.तर धरणगाव (१), बोदवड (२), जळगाव ग्रामीण (६) हे तालुके कोरोना मुक्तीकडे वाटचाल करीत आहेत.







