जामनेर (प्रतिनिधी) – पहुर पोलिस ठाणे हद्दीतील वसंत नगर येथे दागिने पाँलिश करण्याच्या बहाण्याने हातचलाखीने दागिने चोरून नेणाऱ्या परराज्यातील टोळीतील दोघांना पहुर पोलिसांनी अटक केली आहे.
पहुर पोलिस ठाणे अंतर्गत फत्तेपूर दूरक्षेत्रातील कार्यरत पोलिसांना परिसरात वसंत नगर येथे बिहार राज्यातील काही जण पाँलिश करण्याच्या बहाण्याने स्रियांच्या अज्ञानाचा फायदा घेत असल्याची माहिती मिळाली होती. त्यांच्याकडील सोन्याच्या व चांदीच्या दागिन्यांची पाँलिश करून देण्याचा बहाण्याने ते दागिने केमिकलमध्ये वितळवून किंवा हातचलाखीने चोरून नेणारे गावात हिंडत असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी तात्काळ त्यांना ताब्यात घेतले. बबलू अबलु मियाबी (वय३३),व मो.शहेंशाह मो.सादीक (वय २३) दोन्ही रा.पवसिया ता.गोपालपूर जि. भागलपूर (बिहार) यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.त्यांंच्या विरुद्ध पहुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाई पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे, पोलिस उपनिरीक्षक संदिप चेडे,पोहेकाँ. किरण शिंपी, विनय सानप, प्रविण चौधरी, दिनेश मारवडकर,अरुण पाटील, राहुल जोहरे,जिजाबराव कोकटे,गोपाळ गायकवाड, अनिल राठोड यांनी केली.