जामनेर (प्रतिनिधी) – जामनेर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण व्हावे यासाठी जामनेर नगरपरिषद मुख्याधिकारी यांना मराठा महासंघातर्फे निवेदन देण्यात आले.
यावर्षी महाराजांच्या राज्याभिषेकास ३५० वर्षे पूर्ण होत आहे. या मुहूर्तावर पुतळ्याच्या जागेचे भूमिपूजन करून पुतळ्याचे काम लवकरात-लवकर सुरू करण्यात यावे. जामनेर नगर परिषद समोरील जागेत किंवा बीओटी कॉर्नर परिसरात तात्काळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात यावे,अन्यथा अखिल भारतीय मराठा महासंघ, जामनेर तालुका पुतळा उभारणीचे काम हाती घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, याची नोंद घ्यावी असा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाचे तालुका अध्यक्ष राहुल चव्हाण यांनी दिला आहे.
निवेदन देते प्रसंगी,युवक अध्यक्ष -अशोक पाटील, तालुका उपाध्यक्ष-विनोद पाटील,तालुका कोषध्यक्ष- नवल पाटील,शहराध्यक्ष-भगवान खराटे,युवक कार्याध्यक्ष- दशरथ पाटील,भूषण कानळजे,प्रदीप काकडे,,संदीप शेळके,दिपक पाटील,रमेश पाटील,बाळू पाटील,भगवान जाधव अखिल भारतीय मराठा महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.