जळगाव ( प्रतिनिधी ) – शिवाजीनगरातील गेंदालाल मिल परिसरात मोटारसायकलचा धक्का लागल्यावरून दोन गटात हाणामारी झाली एकमेकांवर चाकूने वार करत दोन जण जखमी झाल्याची घटना घडली. १ जून रोजी परस्परविरोधात वेगवेगळे दोन गुन्हे दाखल करण्यात आले.
पहिल्या फिर्यादीत शेख तनविर शेख रहिम यांनी म्हटले आहे की, गेंदालाल मिल परिसरातून भावाच्या मोटारसायकल वरून शेख तनविर १ जून रोजीच्या रात्री घरी येत असतांना सरला सुरेश बर्वे या महिलेला धक्का लागला. यावरून आकाश बर्वे आणि गोलू बर्वे ( दोन्ही रा. रेणुका माता मंदीर गेंदालाल मिल ) यांनी शिवीगाळ करून मारहाण केली एकाने शेख तनविर याच्या मांडीवर आणि पायांवर चाकूने वार करून जखमी केले. आकाश बर्वे आणि गोलू बर्वेवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या फिर्यादीत आकाश बर्वे याने म्हटले आहे की, गेंदालाल मिल येथील रेणूका माता मंदीरजवळून १ जून रोजी मध्यरात्री घरी असतांना शेख तनवीर याच्यासह इतर अनोळखी दोन जण घरात घुसून मारहाण व शिवीगाळ करून दामदाटी केली. तनविरच्या हातातील चाकूने गुडघ्यावर वार करून जखमी केले. आकाश बर्वे याच्या फिर्यादीवरून शेख तनविर याच्यासह इतर दोन जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास स पो नि संदीप परदेशी करीत आहेत.