भाजपा शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्ष प्रवीण जाधव यांचे शासनाला निवेदनरूपी पत्र

जळगाव (प्रतिनिधी) – राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन अनुदानित शाळेतील पायाभूत पदांवरील शिक्षक साधारणता: २००३ते २०१९ या कालावधीत वाढीव पदे मंजूर होऊन सदर जागांवर शिक्षक आपले कर्तव्य प्रामाणिक पणे पार पाडत आहेत. व शासनाने हेतू पुरस्कर दुर्लक्ष करणे सुरु ठेवलेले आहे. गेल्या काळात ह्यातील प्रस्तावित काही शिक्षकांना वैयक्तिक मंजुऱ्या मिळाल्या. तर अनेकांना शिक्षण विभागीय अधिकारी कार्यालयीन चौकटीत अडकवून खेटे मारायला लावत आहेत. राज्य कारभार शासन नाही तर प्रशासन करते आहे कि काय असे वाटते. अनेकदा वारंवार पाठ पुरावा करून सुद्धा त्यांना न्याय मिळत नाही त्यामुळे कोरोना काळातही काही शिक्षकांनी आपआपल्या घरात राहून “आत्मकलेश उपोषण” केलीत आता मात्र संबंधीतांचा अंत पाहू नये त्यांच्या पुढील समस्या अनेक प्रकारच्या आहेत. त्यांचा विचार व्हावा . त्यांच्यावरील अन्याय दूर होणे अपेक्षित आहे. असे जिल्हाध्यक्ष भाजपा शिक्षक आघाडी महानगर जळगाव यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
तसेच राज्यभरातील विनाअनुदानित माध्यमिक शाळांचे मुल्यांकन होऊन सत्तावन्न शाळा मंजूर झाल्या आहेत. संबंधित शाळांना त्या शिक्षणधिकारी यांनी पत्र पाठवून पुढील प्रत्येक वर्षी वाढीव २०-२० टक्के अनुदान तुम्हाला देय राहील असे ३ वर्षांपूर्वी लेखी दिले आहे. त्या वेळी प्रत्यक्ष २० टक्के वेतन अनुदान शिक्षकांना मिळाले. पुन्हा पुढील ४० टक्क्यांचा टप्पा सुद्धा मंजूर होऊन गेल्या वर्षी निधी ची तरतूदहि झालेली पण अजून तो टप्पा वितरीत का होत नाही. कनिष्ठ महाविद्यालयीन असो किवां माध्यमिक शिक्षक यांच्याच वाट्याला हा वनवास का? असे निवेदन श्री.एस.बी.कुलकर्णी .श्री ए.बी.पाटील,श्री.के.एस.पाटील,श्री.पी.एल.हिरे, श्री.सतीश भावसार यांच्यासह मा शिक्षणमंत्री व मा.शिक्षण सचिव यांना देण्यात आले आहे.
आपला स्नेहांकित
प्रवीण जाधव
जिल्हाध्यक्ष म. भाजप शिक्षक आघाडी जळगाव







