जळगाव ( प्रतिनिधी ) – पुण्यातील एका कम्पनीचा व्यवस्थापक असल्याचे सांगत शहरातील एका हॉटेलमध्ये दोन महिने थांबत ‘ खाऊन – पिऊन ‘ जवळपास १ लाख ९० हजार रुपये बिल न देता पळून गेलेय आरोपीला पोलिसांनी मुंबईतून पकडून आणले आहे .
जळगावातील अजिंठा चौफुली येथील हॉटेल महेंद्रामध्ये 14 फेब्रुवारी पासुन 16 एप्रिलपर्यंत मयुर अशोक जाधव, ( रा. प्लॅट नं. 04, श्रीगणेश आर्किड, गंगापुर रोड, रामेश्वर नगर, आनंदवल्ली, नासिक ) याने तो लिंक क्वॉलीटी सोल्युशन (आय) प्रा. लिमी ( वासुकमल बिजनेस स्पेस, सेक्टर नं. 85 / 2 ए/4 पहिला मजला, गणराज स्क्वेअर, बाणेर, पुणे ) या कंपनीत मॅनेजर म्हणुन कामास असल्याची बतावणी करून विश्वास संपादन केला व हॉटेलमध्ये वास्तव्य केले होते. हॉटेलमधील रेस्टॉरंट व बिअरबारमध्ये दारु पिणे व जेवण इत्यादीच्या बिलापोटी त्याच्याकडे बाकी असलेले 1,89,590/ रुपये त्याने न देता परस्पर हॉटेलची रुम सोडुन निघुन गेला होता. हॉटेल चालकाची फसवणुक केली होती. हॉटेल महींद्राचे मालक तेजेंद्रसिंग महींद्रा यांनी फिर्याद दिल्याने
9 मेरोजी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासात आरोपी मुंबई येथे असल्याची माहीती पोलिसांना मिळाली होती. पो.ना. इम्रान सैय्यद, सुधीर सावळे, गोविंदा पाटील यांचे तपास पथक मुंबई येथे रवाना झाले होते. या पथकाने 3 दिवस मुंबई येथे सापळा रचुन आरोपी मयुर जाधव, याचा मिरा रोड, कापुरबावडी मुंबई येथे शोध घेवुन त्यास ताब्यात घेतले होते. त्याला अटक करण्यात आली आरोपीने त्याचेकडे बाकी असलेल्या बिलाची रक्कम भरली आहे त्यास आज न्यायालयात हजर केले न्यायालयाने आरोपीची कारागृहात रवानगी केली आहे. ही कारवाई स.फौ. अतुल वंजारी, पो.ना. इम्रान सैय्यद, सुधीर सावळे, गोविंदा पाटील, सचिन पाटील, म.पो.ना. निलोफर सैय्यद यांनी केली.