जळगाव (प्रतिनिधी) – कर्नाटकामध्ये विधानसभा निवडणूकांचा निकाल जाहिर झाला. यात काँग्रेस पक्षाने ऐतिहासिक विजय प्राप्त केला. याबद्दल कॉग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी कर्नाटकात विजयासाठी परिश्रम करणाऱ्या कार्यकर्ते तसेच जनतेचे आभार मानले आहे.
अनेक वर्षांपासून काँग्रेसचा विजय थोडक्यात हुकत होता, मागील वेळेसही कर्नाटकात काँग्रेसच सरकार होते. मात्र विरोधी पक्षाने वेगवेगळ्या पदधतीने प्रलोभने देवून सरकार घालवल होत. यामुळे जनतेच्या मनात असंतोष निर्माण झाला होता. कनार्टकातील विजयामुळे आता बीजेपीसाठी दक्षिणेचे द्वार बंद झाले आहे. आगामी निवडणूकांमध्ये ही लाट आता संपूर्ण भारत देशात पसरेल. पक्षाचे नेते राहूल गांधींचा भारत जोडोचा संदेश जनेतने स्विकारला आहे. कर्नाटकाच्या जनतेचे पुनश्च अभिनंदन करुन ही नविन पर्वाची सुरुवात आहे. यापुढेही काँग्रेस पक्षाचे विचार मान्य होतील अशी अपेक्षा व्यक्त करतो, असेही ते म्हणाले आहेत.