जळगाव ( प्रतिनिधी ) – वादळी पावसाने जळगाव तालुक्यातील भोकर, गाढोदा ,पळसोद, भादली, कठोरा , धार्डी इदगाव तसेच तालुक्यातील इतर गावांमध्ये भयंकर थैमान घातले शेतकरी हताश झालेला आहे सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे वादळाने नुकसानग्रस्त केळी, पपई, तसेच इतर शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी आज जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.
निवेदन देते वेळी मुकुंद रोटे, हेमंत कोळी, शैलेश चौधरी, भरत पाटील, उमेश धनगर, आदी उपस्थित होते.