आठ तालुक्यांमध्ये कोरोना निरंक
जळगाव (प्रतिनिधी) – आज गुरुवारी १२ नोव्हेंबर रोजी करोनाबाधित रुग्णांची संख्या जिल्ह्यात ३० आढळली असुन दिवसभरात १ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आता पर्यंत जिल्ह्यात एकुण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ५३६९७ झाली आहे. त्यापैकी ५१९८१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आतापर्यंत १२७४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ४४२ रुग्ण उपचार घेत आहेत.दिवसभरात बरे होणाऱ्यांची संख्या ६७ झाली आहे. तसेच जिल्ह्यात ९६.८० टक्के रुग्ण बरे झाले आहेत. मृत्युदर २. ३७ टक्क्यांवर आलेला आहे.
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहर ३, . जळगाव ग्रामीण १, भुसावळ १,अमळनेर ३, बोदवड ५, धरणगाव १,यावल २, जामनेर १४, इतर जिल्ह्यातील ०, एकूण रुग्ण – ३० आढळले आहेत. दिवसेंदिवस कोरोना बाधित रूग्णांची संख्या गेल्या आठवड्यापासून घट्त असल्याने नागरिकांसह प्रशासनाला दिलासा मिळाला आहे, चोपडा, पाचोरा,भडगाव , रावेर, एरंडोल, पारोळा, चाळीसगाव, मुक्ताईनगर, हे आठ तालुके निरंक आले आहे.