लखनौ ( वृत्तसंस्था ) – उत्तर प्रदेशात मदरशांत राष्ट्रगीत म्हणणे अनिवार्य असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उत्तर प्रदेश मदरसा शिक्षण परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रत्येक मान्यताप्राप्त, अनुदानित आणि विना अनुदानित अशा सर्वच मदरशांत या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. मदरशांतील वर्ग सुरु करण्यापूर्वी सकाळी प्रार्थनेच्यावेळी राष्ट्रगीत होणार आहे. रमजान आणि ईदच्या सुट्टीनंतर राज्यातील सर्व मदरशे सुरु झाले १४ मे पासून मदरशांमध्ये बोर्डाची परीक्षा सुरु होणार आहे.
हा निर्णय २४ मार्च रोजी घेण्यात आला होता. पुढील शैक्षणिक सत्र २०२२–२३ मध्ये मदरशे सुरु झाल्यानंतर राष्ट्रगीत दररोज होणार आहे. काही दिवसांपूर्वी मंदिर आणि मशिदींवरील लाऊडस्पीकर हटवण्याचा निर्णय मुख्यमंत्री योदी आदित्यनाथ यांनी घेतला होता. आगामी काळात भाजपाच्या केंद्रीय राजकारणात योगींचे स्थान महत्त्वाचे असेल असे मानण्यात येते आहे.